Wednesday, 28 September 2016

धरणी


धरणी

प्यायला बी पानी नायी ,
समदं रं संपलं ,
करापल्या धरणी पाई,
म्या नांगरां जुपलं .


डोळ्यातल्या पाण्यानीबी,
तीजी तान ना भागली ,
अंगीच्या धामालाबी,
ती नाहीबा जागली.


पाणोड्याला आणुनबी ,
पाणीच लागंना,
बोर हिरी आटल्या ,
कुठं चाराबी दिसंना .


ऐकंक करून बगा ,
समदं गेलं निसटुन ,
हासतं व्हतो वरण,
तुटलो व्हतो आतुन .


जमीनीकं मला आता ,
पाहावत नाही ,
वाडा चिरेबंदी हा
कित्येक साल तसा राही .


चातका परमाणे डोळे ,
सताड ठिवुन,
वाट तुझी बगतो,
श्वास कंठी आणुन .


कधी जागणार तु ,
कधी धरणी बी न्हाणार ,
हिरवाईचं लुगडं ,
कवा पुणा ती ल्याणार .
कवा पुणा ती ल्याणार

                                                                               कवी :-- प्रसाद वाचकवडे

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...