Tuesday, 27 November 2018

कट्यार........


खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला......

कट्यार........

भारलेली ती सकाळ ,
दवबिंदु शिंपीत होती ,
लाजुनी हसणे तुझे ते ,
त्यावरी कोटीच होती.

जाहलो मग मी समोर ,
मोह झाला स्पर्शण्याचा,
भिडली ही नजरेस नजर,
अन् कट्यार ती आरपार होती.

व्हावे मी जखमी कितींदा ,
जाहली ही आता सवय,
अडखळतो पुन्हा त्याच वळणी ,
जी तुझी पायवाट होती.

केला मी निर्धार पक्का ,
तोडुनी टाकावेत बांध ,
भावना गुंफावी शब्दात ,
जी अंतरी खोलात होती .

आला तो दिस अखेर सोन्याचा ,
तु माझ्या समोर होती ,
भावना एकवटल्या ओठी ,
अन् तीथेच दुःखाची नांदी होती .

नजर जाता अनामिकेवर ,
चमकली ती अंगठीच होती ,
तुटल्या भावना क्षणार्धात ,
ती माझी काळरात्र होती.

                                    कवि- :प्रसाद वाचकवडे

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...