Wednesday, 19 April 2017

चांदोबा चांदोबा ......

चांदोबा चांदोबा आता तु खरा भागणार ,
लिंबोणी चे झाड नाही तु कुठे लपणार ,
सिमेंट च हे जंगल लई बेबंदी ,
त्यात मामाचा वाडा नाही राहीला चिरेबंदी .

मामाचा वाडा जाऊन तिथे आला टॉवर ,
टु बी एच के फ्लॅट मिळाला विथ बॅकअप पावर ,
मामाच्या घरी एकदा येऊन जा ,
चायनीज ,पिझा नी बर्गर खाऊन जा ,
चायनीज मध्ये सापडली माशी ,
चांदोमामा तु आता राहणार उपाशी .

वाड्यात होती मजा ,तशी उरली आता नाही,
एकमेकांना साथ द्याया , वेळ नाही काही  ,
कोजागिरीत जागवलेल्या त्या अनेक रात्री ,
सख्ये नव्हते कोणी पण नात्यांना लागली आता कात्री ,
चार भिंतीच आता सगळयांचं जीवन झालंय,
टॉवरनी वाडयातल्यांना आता दुर दुर नेलंय .

चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास
ते गेले दुर तसे तु नाही ना गेलास ,
हाकेला तु तरी माझ्या ओ देशील काय ,
आमच्या तलं अंतर कमी करशील काय ,
आमच्या तलं अंतर कमी करशील काय ...

कवी : प्रसाद वाचकवडे

Sunday, 16 April 2017

बालपण.


बालपण.

वाढताना वय निसटुन जाई हातातुन ,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.


तेव्हा प्रत्येक कृतीला ,मला मिळायचा खुप भाव ,
आणि चुकलो जरी , सुधारायला भरपुर वाव .
रोजचेच होते माझे , चांदोबा ,चांदण्याचे गाव ,
फक्त खाऊचीच होती ,नव्हती दुसरी कुठली मला हाव,
आता आठवताना वाटतं, किती जम्माडी ती होती पण,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.


उन्हाळी सुट्टी कशी घालवावी याची जय्यत तयारी,
कैरी तोडण्या,नदी डुंबण्यास निघायची स्वारी ,
मामी बनवायची रोज रोज नवी नवी न्याहारी,
तेव्हा मामाच्या गावाची मजाच खुब होती न्यारी,
आता आठवलं की वाटतं काहीतरी मागे राहीले पण ,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.


आता ह ह ह
आता चुकायचा नाही राहीला काहीच अधिकार,
शब्द चुकता खावे लागतात शब्दांचेच फटकार,
हल्ली चुकली जर कृती , प्रश्नांचे यथेच्छ भडीमार,
आवडणाऱ्या गोष्टी टाळतो, स्टेस्टस असतं समोर ,
देवा बास झालं प्रेशरआता,परतं थोडं देतो का तु पण,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.
 
 
                                                                                            कवी:- प्रसाद वाचकवडे
 

Wednesday, 12 April 2017

श्वास


श्वास,

डॉक्टर काका डॉक्टर काका ,एवढच मला सांग ,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.
सोनोग्राफी होता, सुरुवात याची झाली,
बघुन तुम्ही रिपोर्ट सकळा खुषखबरी दिली,
चेहरे खुलले , आतातरी मुलगाच होणार ,
पैसे न कमवता तुम्ही तरी , कसे काय बोलणार ,
सांगीतल्यावर तुम्ही आईत , नाही उरले त्राण .
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

घरी जाता बाबांच्या , वाटलं आनंद झाला असेल ,
पंचारतीचे ताट , काका पेढे वाटत हासेल ,
आई घरात शिरताच , तिला शिव्यांच्या लाखोल्या ,
उणे दुणे काढुन , तळतळाट आणि वाकुल्या ,
मुलगा नसेल तर पुन्हा मुलगी नको मला ,
काय करायचे कर , बाबा ,आजी म्हणती तिला ,
कळत होते मला पण , मला तेव्हढी होती जाण ,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

उद्याच होणार सोक्षमोक्ष , सगळे तोऱ्यात बोलले ,
बाबांचे आणि तुमचे व्यवहाराचे बोलणे झाले ,
त्या रात्री आई पण ढसा ढसा रडली ,
अबला पणावर तिच्या , ती मनसोक्त चिडली,
हात ठेवुन पोटावर , ती तशीच निजली ,
माझी काय चुकी यात सारी रात मी जागली ,
स्वप्नात पण बडबडत होती माझी तुम्हाला आण,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

एका दिवसाच्या जगण्यात मी खुप शिकले,
मुलासाठी बाबानी मला कसायाला विकले ,
गेलो हॉस्पीटलात , तयारी सगळी होती झाली ,
भितीने मी तेव्हा , पुरती भेदरूनच गेली .
बळजबरी आईला कसलं औषध पाजलं ,
क्षणार्धात माझे तेव्हा अंग हो जळलं ,
तोडलं आईपासुन तिच्या पोटी आहेत व्राण,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

जगायचं होतं मला , खुल्या आसमानात स्वछंद ,
माश्यासारखं डुंबायंच , पक्षासारखं जगणे बेधुंद ,
घ्यायचा होता मलाही मनसोक्त श्वास,
झाशीच्या रानीसारखा प्राबाल्यक ध्यास ,
व्हायचे होते आई जिजाऊ , जिने स्वराज्य निर्मिली ,
कित्येक होती स्वप्ने माझी तु बेचीराख केली ,
काय होती चुकी माझी , मला एकदाच तु सांग,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

Dedicated to all my beloved baby girls from all over the world who not take a single breath.............

                                                                                        कवि- प्रसाद वाचकवडे .

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...