Sunday, 21 May 2017

प्रेम विवाह


प्रेम विवाह

मनात आलं माझ्या,
प्रेम विवाह पहावा करून,
करून कोणावर तरी ,
प्रेम घागर घ्यावी भरून .



लावली सेटींग लगोलग ,
चौकात बसायला लागलो ,
एकदम शायनर मुलासारखं,
मी पण रोज वागलो .



एक पोरगी बघायची,
माझ्याकडे वळुन वळुन ,
मी बघताच तिच्याकडे ,
जायची पुढे आडाण्यासारखं कळुन .



एकदा गाठलचं तिला ,
मारला प्रपोज , विचारलं ,
लाजुन ती ही म्हणाली , होय .
माझ्यात आता प्रेम भूत संचारलं .



सात आठ महिन्यातचं ,
पळुन जाऊन लग्न झालं ,
कारण तिच्या घरच्यांनी ,
माझ्या प्रेमाला नाकारलं .



म्हणतात ते खरचं लग्न,
म्हणजे नसते ते विघ्न,
आम्ही राजा राणी झालो ,
आपल्या संसारात मग्न .



वर्षातच झालं आमचं,
तंटायुध्द चालु ,
ती म्हणाली माझ्या बरोबर ,
नको तु बोलु .



साडीवरून लागलेली आग ,
एवढी पेटत गेली ,
समजावले तिला तरी ,
ती नाही समजली .



मग चालु झालं,
SMS चं सत्र ,
बोलणं कमी घरी ,
फक्त मोबाईल पत्र .



हसत म्हणाली एकदा,
आपण होऊ वेगळं ,
वाळु निसटावी हातातुन ,
तसं निसटलं सगळं .



मी पण किती वेळ,
संसार गाडा ओढणार ,
ती म्हणाली तसाच ,
मी ही डाव मोडणार .



असं सगळं असतं ,
म्हणुन प्रेम विवाह करू नये,
गोड असतोच ऊस ,
म्हणुन मुळासकट खाऊ नये .


कवि- प्रसाद वाचकवडे .

 

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...