Sunday, 21 May 2017

चांद्र मोहीम


चांद्र मोहीम

चांदोबा चांदोबा ,
तुला माहीत आहे काय ,
पृथ्वीवरच्या मानवांना ,
ठेवायचेत तुझ्यावर पाय .


तयारी चाललीये यंत्रे नविन बनवुन,
ती तुझ्यावर पुरण्याची,
येत्या काही वर्षात ,
तुझ्यावर हनीमुन करण्याची .


तु बाबा , जरा जपुणच राहा ,
अजुनही तुच आहेस भुषण,
मात्र काही वर्षात येणार हे ,
तुझ्यावर पृथ्वीच प्रदुषण .


मग तोच होणार आटापिटा,
चंद्र वाचवा मोहीम ,
मग पुन्हा नव्या ग्रहाचा शोध ,
अशीच चालणार  ग्रहशोध मोहीम .


                                                                                 कवी -: प्रसाद वाचकवडे

प्रेम विवाह


प्रेम विवाह

मनात आलं माझ्या,
प्रेम विवाह पहावा करून,
करून कोणावर तरी ,
प्रेम घागर घ्यावी भरून .



लावली सेटींग लगोलग ,
चौकात बसायला लागलो ,
एकदम शायनर मुलासारखं,
मी पण रोज वागलो .



एक पोरगी बघायची,
माझ्याकडे वळुन वळुन ,
मी बघताच तिच्याकडे ,
जायची पुढे आडाण्यासारखं कळुन .



एकदा गाठलचं तिला ,
मारला प्रपोज , विचारलं ,
लाजुन ती ही म्हणाली , होय .
माझ्यात आता प्रेम भूत संचारलं .



सात आठ महिन्यातचं ,
पळुन जाऊन लग्न झालं ,
कारण तिच्या घरच्यांनी ,
माझ्या प्रेमाला नाकारलं .



म्हणतात ते खरचं लग्न,
म्हणजे नसते ते विघ्न,
आम्ही राजा राणी झालो ,
आपल्या संसारात मग्न .



वर्षातच झालं आमचं,
तंटायुध्द चालु ,
ती म्हणाली माझ्या बरोबर ,
नको तु बोलु .



साडीवरून लागलेली आग ,
एवढी पेटत गेली ,
समजावले तिला तरी ,
ती नाही समजली .



मग चालु झालं,
SMS चं सत्र ,
बोलणं कमी घरी ,
फक्त मोबाईल पत्र .



हसत म्हणाली एकदा,
आपण होऊ वेगळं ,
वाळु निसटावी हातातुन ,
तसं निसटलं सगळं .



मी पण किती वेळ,
संसार गाडा ओढणार ,
ती म्हणाली तसाच ,
मी ही डाव मोडणार .



असं सगळं असतं ,
म्हणुन प्रेम विवाह करू नये,
गोड असतोच ऊस ,
म्हणुन मुळासकट खाऊ नये .


कवि- प्रसाद वाचकवडे .

 

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...