खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला......
कट्यार........
दवबिंदु शिंपीत होती ,
लाजुनी हसणे तुझे ते ,
त्यावरी कोटीच होती.
जाहलो मग मी समोर ,
मोह झाला स्पर्शण्याचा,
भिडली ही नजरेस नजर,
अन् कट्यार ती आरपार होती.
व्हावे मी जखमी कितींदा ,
जाहली ही आता सवय,
अडखळतो पुन्हा त्याच वळणी ,
जी तुझी पायवाट होती.
केला मी निर्धार पक्का ,
तोडुनी टाकावेत बांध ,
भावना गुंफावी शब्दात ,
जी अंतरी खोलात होती .
आला तो दिस अखेर सोन्याचा ,
तु माझ्या समोर होती ,
भावना एकवटल्या ओठी ,
अन् तीथेच दुःखाची नांदी होती .
नजर जाता अनामिकेवर ,
चमकली ती अंगठीच होती ,
तुटल्या भावना क्षणार्धात ,
ती माझी काळरात्र होती.
कवि- :प्रसाद वाचकवडे